Sunday 26 August 2012

Calligraphy-26.08.2012


कवी ग्रेस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतीलस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतील

No comments:

Post a Comment