Monday 31 December 2012

Calligraphy-31.12.2012


१३ दिवस मृत्यूशी झुंज देणारी ती तरुणी काल पंचतत्वात विलीन झाली . सरत्या वर्षातील कटू आणि हजारो वर्षाची परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीवर कायमचा डाग कोरून गेलेली घटना.
ह्या घटनेमुळे जे अनेक प्रश्न निर्माण झालेत..... त्यातलाच हा ही एक सश्रद्ध मनात उमटलेला प्रश्न. .

( ह्या घटने निमित्त निवडलेल्या कुसुमाग्रजांच्या " देवाच्या द्वारी " ह्या दीर्घ कवितेतील  काही निवडक ओळी  आहेत. पूर्ण कविता तीन भागात असून १९३२, १९३५ आणि  १९३७ साली लिहिलेली आहे) 

Sunday 30 December 2012

Calligraphy-30.12.2012



मराठीतील जेष्ठ कवी  कै अरुण कोलटकर ह्यांची " भिजकी वही" ही कविता . मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून जी डी आर्ट्स झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात काम केले आणि अनेक पारितोषिकेही मिळवली. " जेजुरी " काव्यसंग्रहाला १९७७ साली Commonwealth Writteres पुरस्कार मिळाला तर २००५ साली " भिजकी वही " ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संत तुकारामांचे अभंग इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने अनुवाद केले आहेत
भिजकी वही :
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फ़ुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत गवत खाणारया म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो

-अरुण कोलटकर



Today's calligraphic tribute to Poet Arun Kolatkar. He was an artist from J J School of Art and worked as graphic designer and received various awards for his work. His first book of English Poetry Jejuri received Commonwealth Writters' Prize in 1977 and his another collection of poems " Bhijki Vahi " received Sahity Akademi Award in 2005

Saturday 29 December 2012

Calligraphy-29.12.2012

कवयित्री संजीवनी बोकील ह्यांची " ओढ " ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poetess Sanjeevani Bokil

Friday 28 December 2012

Calligraphy-28.12.2012

            कवी दासू वैद्य ह्यांची " तूर्तास " ह्या काव्यसंग्रहातील " आम्हीच आपले " ही कविता .
Today's calligraphic tribute to Poet Dasoo Vaidya

Thursday 27 December 2012

Calligraphy-27.12.2012


दत्तभक्त कवी सुधांशु  अर्थात  हणमंत नरहर जोशी ह्यांची ही प्रसिद्ध रचना. आर . एन .पराडकर ह्यांनी ही रचना गायिली असून , संगीतबद्धही केली आहे.
६ एप्रिल. १९१७ रोजी औदुंबर येथे जन्मलेल्या कवी सुधांशु ह्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला . पुढे ग्राम सुधारणेच्या कार्यात वाहून दिले. १९३९ साली सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली . अजरामर अशी दत्त गीते लिहिणाऱ्या कवी सुधांशू ह्यांचे कौमुदी, गीत् दत्तात्रय, गीत सुधा असे १६ काव्यसंग्रह. एक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.


१९७४ साली भारत सरकारच्या  पद्मश्री पुरस्काराने त्यांना सम्मानित करण्यात आले 
Today's calligraphic tribute to Poet Sudhanshu

Wednesday 26 December 2012

Calligraphy-26.12.2012


थोर समाजसुधारक, विचारवंत,  आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट कार्य उभे करणारऱ्या कवी मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे ह्यांचा आज जन्मदिवस .विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ साली त्यांचा जन्म झाला. बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली. पण १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर कुष्ठरोग/महारोग सेवा समितीची त्यांनी स्थापना केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवना’ची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा  इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर केवळ वैद्यकीय उपचार करण्याइतकचं मर्यादित काम न करता कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातून त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य घडवून आणलं. त्यामुळे कुष्ठरोगी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडून आला.
बाबा आमटे हे एक कोमल मनाचे कवीही होते. त्यांचे काही कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यात समाजभानाचे दर्शन घडते. ‘ज्वाला आणि फुले’, ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन’, ‘माती जागवील त्याला मत’, ‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘करुणेचा कलाम’ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध  आहेत.
 " शृंखला पायी असू दे , मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही ही संपूर्ण कविता ह्या प्रमाणे.




शृंखला पायी असू देमी गतीचे गीत गाई
दु: उधळायास आताआसवांना वेळ नाही
ओस आडोशात केलेपापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेवून हातीजिद्द प्राणांची निघाली
घाबरी करूणा जगाचीलांबोनी चतकोर झाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई 
त्या तिथे वळणावरती पण वेळ क्षण एक आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला
घोर रात्री श्वापदांच्यामाजलेले रान होते
पांगल्याना पत्थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन त्यक्त ती लाचारी माती
त्यातुनी आले हृतुंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द राणी गर्जली आनंद द्वाही

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्यायेथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीलायेऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगाद्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याचीयेथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथेयेथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली हि सर्व निधाळाची कमाई 
बाबा आमटे
( ज्वाला आणि फुले)

Tuesday 25 December 2012

Calligraphy- 25.12.2012

मराठी भाषेची  प्रशस्ती लिहिणारे आद्य ख्रिस्त कवी फादर स्टीफन्स  ह्यांची ही रचना . वयाच्या ३० व्या वर्षी १५७९ मध्ये  फादर स्टीफन्स इंग्लंडहून भारतात गोव्याला पोहोचले. इथे आल्यावर कोंकणी मराठी भाषा आत्मसात केली. फादर  स्टीफन्स ह्यांच्या लेखांवर त्यांचे समकालीन संत एकनाथ , तसेच तुकाराम महाराजांचा प्रभाव होता . अशा विलक्षण प्रतिभेतून  १०९६२ ओव्यांचे 'ख्रिस्तपुराण'हे महाकाव्य ,धोत्रीन क्रिस्त आणि   कोंकणी -मराठी व्याकरण ह्या ग्रंथांची निर्मिती केली .  

Monday 24 December 2012

Calligraphy-24.12.2012

                                                                 कवी वैभव जोशी ह्यांची ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Vaibhav Joshee

Sunday 23 December 2012

Calligraphy-23.12.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " मुक्तायन " ह्या काव्यसंग्रहातील " स्वर " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Kusumgraj

Saturday 22 December 2012

Calligraphy-22.12.2012

जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर ( गणेश तात्याजी हलसगीकर ) ह्यांची ही कविता .७ ऑगस्ट १९३४ रोजी सोलापूर येथे जन्म झालेल्या कवी दत्ता हलसगीकर ह्यांनी काव्यलेखानाबरोबर ललित लेखनही केले. त्यांचे आषाढघन, उन्हातल्या चांदण्या , करुणाघन ,चाहुले वसंताची असे एकूण ७ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या " उंची " ह्या गाजलेल्या कवितेचे तर सुमारे २२ भाषेत  भाषांतर झाले आहे.
जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर ( गणेश तात्याजी हलसगीकर ) ह्यांची ही कविता .७ ऑगस्ट १९३४ रोजी सोलापूर येथे जन्म झालेल्या कवी दत्ता हलसगीकर ह्यांनी काव्यलेखानाबरोबर ललित लेखनही केले. त्यांचे आषाढघन, उन्हातल्या चांदण्या , करुणाघन ,चाहुले वसंताची असे एकूण ७ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या " उंची " ह्या गाजलेल्या कवितेचे तर सुमारे २२ भाषेत  भाषांतर झाले आहे.
Today's calligraphic tribute to Poet Datta Halasgikar 

Friday 21 December 2012

Calligraphy-21.12.2012

जेष्ठ कवी बा भ बोरकर ( बाळकृष्ण भगवंत बोरकर ) ह्यांनी ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Ba Bha Borkar 

Thursday 20 December 2012

Calligraphy-20.12.2012


जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे ह्यांची कविता 
Today's calligraphic tribute to Poetess Asavari Kakade. 

Wednesday 19 December 2012

Calligraphy-19.12.2012


जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची ही कविता
 Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Kaje

Tuesday 18 December 2012

Calligraphy-18.12.2012

जेष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Sudheer Moghe.

Monday 17 December 2012

Calligraphy-17.12.2012

कवी प्रकाश होळकर ह्यांच्या " कोरडे नक्षत्र " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता. त्यांचे कोरडे नक्षत्र , मृगाच्या कविता हे काव्यसंग्रह प्रकाशीत झाले  आहेत. टिंग्या आणि बाबू बेंड बाजा ह्या चित्रपटातील गीतलेखनासाठी महाराष्ट्र  शासनाचे पुरस्कार लाभले आहेत.
Today's calligraphic tribute to Poet Prakash Holkar.

Sunday 16 December 2012

Calligraphy-16.12.2012


जेष्ठ कवयित्री शिरीष   पै  ह्यांची ही कविता 
Today's calligraphic tribute to poetess Shirish Pai

Saturday 15 December 2012

Calligraphy-15.12.2012


 जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना . किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्या
तील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही. 
इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती 
इतिहास तुडविला त्यांची देखील कीर्ती 
गहिवरला अश्रू कीर्ती स्तंभावरला
पिंडास कावळा अजुनी शिवला नाही.
Today's calligraphic tribute to Poet Roy Kinikar. 

Friday 14 December 2012

Calligraphy-14.12.2012

आज १४ डिसेंबर..  कवी ,गीतकार, पटकथालेखक, गीतरामायणकार  ग दि माडगूळकर ह्यांचा स्मृतिदिन.
सहज सोप्या  शब्दातून केलेली मराठी गीत निर्मिती आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून आहे. संत वाड्मयाचा त्यांच्यावर झालेला संस्कार , त्यांच्या अनेक चित्रपटासाठी लिहिलेल्या सुंदर गीतांतून दिसून येतो. कवितेमधून , गीतामधून दिसून आलेले 
अस्सल मराठ्मोळेपण हेहि एक वैशिष्ठ . त्यांच्या गीत रामायणाने  तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी  दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
.
प्रारंभी   वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करणाऱ्या गदिमांनी  पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा , जोगिया, चार संगीतिका, गीतरामायण , काव्यकथा , चैत्रबन (चित्रपटगीते), गीतगोपाल, गीतसौभद्र, पुरिया -अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे.गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ चित्रपटांत अभिनयही केला.  याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्‌मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. 
आजची कविता त्यांच्या " पुरिया " ह्या काव्यसंग्रहातील " ईश्वराचा अंश " ही कविता. 


Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar.

Thursday 13 December 2012

Calligraphy-13.12.2012




आपल्या अलौकिक प्रतिभेने भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत ह्यांचा मिलाफ करणाऱ्या  प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर ह्यांना आदरांजली.
( आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे कडवे जेष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर ह्यांनी लिहिलेल्या " छळतसे काजळ काळी रात" ह्या नाट्यगीतातील  आहे. ).
Today's calligraphic tribute to Pandit Ravishakar. 

Wednesday 12 December 2012

Calligraphy-12.12.2012


अतिशय लहानपणातच स्वत:च्या आणि भावंडांच्या नशिबी आलेली अवहेलना , कुचेष्टा सहन करतानासुद्धा जगातील प्राणीमात्रांसाठी पसायदान मागणारे , महाराष्ट्रात वारकरी धर्माचा पाया रचणारे संतश्रेष्ठ, संत ज्ञानदेव 

आपल्याला परमात्म्याने दिलेले कार्य पूर्ण झाले, आयुष्याचा हेतू सफल  झाला  ,आता कशासाठी जगायचे हा विचार करून , आपल्या वडीलबंधू निवृत्तीनाथ ह्यांची अनुज्ञा घेऊन , कार्तिक वद्य त्रयोदशी , शके १२१५ रोजी , आळंदी येथे संजीवन समाधी घेतली . वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानदेवांचा ७१६ वा संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे संपन्न होत आहे. 
त्यानिमित्त कवी अशोकजी परांजपे ह्यांची ही रचना.संगीतकार कमलाकर भागवत ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून सुमन कल्याणपूर  ह्यांनी ती गायिली आहे

.समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये

निवृत्तीनाथांनी चालविले हाती
पाहुनी ती मूर्ती धन्य वाटे
आपण निर्गुण मागे परि दान
विश्वाचे कल्याण-निरूपण

सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ
मायेचे हे बळ राया बोले
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रम्हज्ञान

नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ
सज्जनाचे बळ समाधान

गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले ?
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण

पैलतिरी हाक आली आज कानी
करूनी निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्‍तजन

Tuesday 11 December 2012

Calligraphy-11.12.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या मुक्तायन ह्या काव्यसंग्रहातील " मुक्त " ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Kusumgraj.

Monday 10 December 2012

Calligraphy-10.12.2012

कथा, कादंबरी, नाटक आणि  आपल्या कवितेने मराठी मनाला भूरळ घालणारे कवी   आरती प्रभू (चि. त्र्यं. खानोलकर ) ह्यांची ही रचना .पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना , लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे 

Sunday 9 December 2012

Calligraphy-09.12.2012

जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांची ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant

Saturday 8 December 2012

Calligraphy-08.12.2012

भाऊसाहेब पाटणकर ( वा. वा.पाटणकर) हे मराठी " शायरी "चे जनक म्हणून ओळखले जातात. खऱ्या अर्थाने मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. 
Today's Calligraphic tribute to Bhausaheb Patankar's  " Sangel Kahi Bhvya Aishee" gazal from his collection Jindadil. He brought Gazal and Shayari into Marathi literature and gave us beautiful collections like Dost Ho and Jindadil. 

Friday 7 December 2012

Calligraphy-07.12.2012


जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची ही "ठेविले अनंते" ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Kaje

Thursday 6 December 2012

Calligraphy-06.12.2012


आज ६ डिसेंबर . भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांची पुण्यतिथी .सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या  जीवनकार्यावर कवी कुसुमाग्रज ह्यांनी लिहिलेली 'पाथेय' ह्या काव्यसंग्रहातीलही कविता . 
Today's calligraphic tribute to Bharatratna  Dr B R Ambedkar ( Dr Babasaheb Ambedkar). The poem is written by Poet Kusumagraj in his collection " Pathey"

Wednesday 5 December 2012

Calligraphy-05.12.2012

खरतर निरक्षर , अपठिक परंतु प्रतिभेचे असामान्य देणे लाभलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्यांची " योगी आणि सासुरवाशीण".   सासरी  शेतावर कष्ट करताना  माहेरची आठवण येणारी स्त्री.. आणि त्या आठवणीत माहेरावरची गाणी गात असताना त्या शेताच्या बाजूला ईश्वर चिंतन करणाऱ्या साधूला ह्या माहेरच्या गाण्यांचा त्रास होतो  आणि ह्यावरून तो योगी आणि ती सासुरवाशीण ह्या दोघातील संवादातून उलगडत जाणारी ही कविता..माहेरा विषयी मनात अपार श्रद्धा असलेल्या स्त्रीने  'सासर-माहेर बद्दलच्या  योग्याच्या प्रश्नाला दिलेले हे एक  हृदयस्पर्शी उत्तर.

Tuesday 4 December 2012

Calligraphy-04.12.2012

    जेष्ठ साहित्यिका आणि कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची मंत्राक्षर ह्या काव्यसंग्रहातील ही कविता.
Today's calligraphic tribute to Poetess Aruna Dhere

Monday 3 December 2012

Calligraphy-03.12.2012



जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना . किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा  कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्यातील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील  छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही. 
Today's calligraphic tribute to Poet Roy Kinikar

Sunday 2 December 2012

Calligraphy-02.12.2012

प्रख्यात लघुनिबंधकार, पत्रकार आणि आधुनिक मराठी कवी अनंत काणेकर ह्यांची ही रचना.  त्यांचा जन्म २ डिसेंबर ,१९०५ मध्ये मुंबईत झाला.  काही काळ ‘चित्रा ’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले होते.   ‘पिकली पाने ’हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह. आणि ‘धुक्यातून लाल तार्‍याकडे ’ हे त्यांचे प्रवासवर्णन तर खूपच गाजले होते. चांदरात आणि इतर कवितासंग्रह. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघडया खिडक्या, राखलेले निखारे, बोलका ढलपा हे लघुनिबंधसंग्रह, दिव्यावरती अंधेरे हा लघुकथासंग्रह. धुक्यातून लाल तार्‍याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती हे प्रवासवर्णनपर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 
Today's calligraphic tribute to Poet Anant Kanekar

Saturday 1 December 2012

Calligraphy-01.12.2012


मराठीतील एक युगप्रवर्तक कवी, साहित्यिक बा सी मर्ढेकर ( बाळ सीताराम मर्ढेकर) ह्यांची ही कविता .खानदेशातील फैजपूर येथे १ डिसेंबर १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. धुळे येथे मॅट्रीकपर्यतचं शिक्षण घेतल्यावर पुण्यातील फ़र्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली.  त्यांनतर काही काळ त्यांनी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून आणि महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक म्हणून कार्य केलं. आणि १९३८ साली त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.मर्ढेकरांची नवकविता  यंत्रयुगातील मानवाची  घुसमट मराठी कवितेतून प्रथमच जाणवली.  त्यामुळेच मर्ढेकरांच्या निर्मितीला वाड्.मयीन घटना आणि त्यांच्यापासूनच्या साहित्यिक कालखंडाला 'मर्ढेकर युग'मानलं जातं.  'गणपत वाणी बिडी पितांना'  'पिपात मेले, ओल्या उंदीर सारख्या कविता लिहिणाऱ्या मर्ढेकरांनी  , 'भंगू दे काठिन्य माझे' सारखी कविता लिहून  करुणा ही भाकली .मर्ढेकरांचे हे जणू पसायदानच आहे

भंगु दे काठिन्य माझे 


भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊं दे मनींचे;

येऊ दे वाणीत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य,आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.

राहु दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारातले गा;
अक्षरा आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळू दे
दे थिजु विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभु दे भाषा शरीरा.

जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्य़ाची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून माते
शब्द तूझा स्पंदनाचे

त्वसृतीचे ओळखू दे
माझिया हाता सुकाणू;
थोर यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची;
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे;

घेऊ दे आघात तीते
इंद्रियद्वारा जगाचे;
पोळू दे आतून तीते
गा अतींद्रियार्थांचे 

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.


काय मागावे परी म्यां

तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!

- बा. सी. मर्ढेकर