Tuesday 2 July 2013

Calligraphy-02.07.2013


अक्षर वारीतील आज संत ज्ञानेश्वरांची रचना
पूर्वापार चालत आलेल्या रूढी ,परंपरा … त्या स्वीकाराव्यात की झुगारून द्याव्यात ह्या प्रश्न सतत पडत राहतो . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ह्या संदर्भात विवेचन करताना  संत ज्ञानेश्वरांनी असे लिहिले आहे की " तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित ते स्वीकारिती । शाश्वत ते ॥ 
सूर्य उगवला कि संपूर्ण विश्व प्रकाशमान होते .त्यावेळी जगातील सर्व रस्ते डोळ्यांना दिसू लागतात म्हणून प्रत्येक रस्ता आपण पायाखाली घालत नाही , तर आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी पोहोचवणारा मार्गच आपण निवडतो . तसेच पृथ्वी पाण्याने भरून गेली तर , केवळ उपलब्ध आहे म्हणून सगळे पाणी आपण पिणार नाही तर , आपली तहान भागवण्याइतकेच पाणी आपण ओंजळीने घेऊ त्याच न्यायाने विवेकी मनुष्य वेदार्थांचा धांडोळा घेतो , त्यातील कालसापेक्ष भाग वगळून जो शाश्वत आहे त्यातील अपेक्षित तेवढाच अंगीकारतो 

( संदर्भ: अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जें - अभय टिळक )

No comments:

Post a Comment